Saturday 16 June 2012

बाबासाहेब पुरंदरे

हेलकावे घेणार्‍या पालखीचा गोंडा धरून राजे पालखीत बसले होते. पालखीवर झाकलेल्या आलवनामुळे राजांना काही दिसत नव्हतं. फक्त बाजी प्रभूंचा आवाज कानावर येत होता, "चला"
चला!
कुठं जायचं?
एका माणसाच्या जीवासाठी धावायचं कुठवर?
बाजी! कशासाठी हे कष्ट घेता?
कोणाच्या स्वार्थापायी?
आणि तेही एका माणसाच्या जिवापायी?
कोणाच्या सत्तेनं आम्ही या माणसांना गुंतवलं?
कोणत्या अधिकारानं?
जीवनात अखेर मोल असतं ते स्वत:च्या जीवाचं!
मग त्या जीवाच्या कवड्या यांनी आम्ही मांडलेल्या पटावर का उधळाव्यात?
 "वास्तविक संपूर्ण शिवचरित्र अद्याप इतिहासकारांना गवसलेलंच नाही. लक्षावधि कागदपत्रे अजून अंधारातच आहेत. अज्ञानामुळे आणि अनास्थेमुळे अगणित कागदपत्रे नष्ट होत आहेत. कुणी पाणी तापविण्यासाठी त्यांचे जळण करत आहे, कुणी फटाकडे करण्यासाठी ती वापरीत आहे; कुणी ताबूताला ती अस्तर म्हणून चिकटवत आहे. वाळवीच्या किड्यांचा उदरनिर्वाह मुख्यत: या ऐतिहासिक कागदपत्रांवरच चालतो म्हणे! आळस, अज्ञान व अनास्था ह्या तिघांचं प्राबल्य आमच्या जीवनात पसरलेलं आहे. इतिहास म्हणजे अत्यंत मौल्यवान राष्ट्रीय धनदौलत आहे."

-- बाबासाहेब पुरंदरे                                                                            sandip pattl , kavalapur .9561710766

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.